विजेच्या खांबात उतरलेल्या प्रवाहाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
विजेच्या खांबाला अचानक स्पर्श होवून जोरदार विजेचा शॉक लागल्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू.
भोकरदन | औरंगाबाद : घराजवळील विजेच्या खांबाला अचानक स्पर्श होवून जोरदार विजेचा शॉक लागल्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ( ता. सात) गुरुवारी सकाळी सहा वाजेदरम्यान भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहांगीर गावात घडली. ईश्वर पुंजाराम दळवी (२७) असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे
भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहांगीर येथील शेतकरी ईश्वर पुंजाराम दळवी याची गावलगत शेतजमीन आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते दूध आणण्यासाठी शेतात गेला होता. दूध घेऊन तो सहा वाजेदरम्यान घरी परतला. यादरम्यान घराजवळील एका
विजेच्या खांबात रिमझिम पावसामुळे विज प्रवाह उतरला. शेतकरी ईश्वरला याची कल्पना नव्हती. तो या खांबा जवळून जात असतांना अचानक त्याचा खांबाला स्पर्श झाला व त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. काहीवेळाने ही घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. गावकऱ्यांनी तत्काळ त्याला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ईश्वर याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतांना अचानक काळाने त्याच्यावर घाला घातला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: death of a young man due to current falling into electric Shock
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App