अहमदनगर: पोलिस ठाण्यातून निघाली ती घरी परतलीच नाही
Breaking News | Ahmednagar: आई-वडिलांशी किरकोळ वाद झाल्यानंतर ती तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली. पाठीमागे आई-वडीलही गेले. तिने तक्रार दिली अन् घरी तो म्हणून रात्री साडेदहा वाजता निघाली. पण ती घरी गेलीच नाही.
नगर : आई-वडिलांशी किरकोळ वाद झाल्यानंतर ती तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली. पाठीमागे आई-वडीलही गेले. तिने तक्रार दिली अन् घरी तो म्हणून रात्री साडेदहा वाजता निघाली. पण ती घरी गेलीच नाही.
याबाबत आईने पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले, पीडित मुलगी न्यू आर्टस् महाविद्यालयात १२ मध्ये शिकत आहे. ११ मार्च रोजी सायंकाळी आई- मुलीचे किरकोळ वाद झाले. त्यावरून मुलगी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली. त्यापाठोपाठ आई- वडीलही गेले. मुलीने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ती घरी जाते असे सांगून निघून गेली. आई- वडील घरी आले पण मुलगी घरी नव्हती. रात्री १२ वाजेपर्यंत वाट पाहिली पण ती घरी आली नाही. शेवटी पुन्हा पोलिस ठाण्यात येऊन आईने गुन्हा दाखल केला.
Web Title: She left the police station and did not return home
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study