Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यात वादळी वारा व मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. तालुक्यात आज दोन दुर्दवी घटना घडल्या आहेत. पठार भागात अकलापूर गाव अंतर्गत मुंजेवाडी शिवारात भिंत अंगावर पडून तीन जण जागीच ठार झाले तर दोन जखमी झाल्याची घटना दुपारी चार वाजता घडली. तसेच मालदाड गावातही झाड अंगावर पडून एका महिलेचा प्राण (Death) गेल्याची घटना घडली आहे.
तालुक्यात सव्वातीन वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की, रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. घरांची पत्रे उडून गेली. विजेची खांब पडली. गुंजाळवाडी येथे दोन घरांची पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याची कामे सुरु होती.
संगमनेर तालुक्यातील मालदाड गावात वादळी वाऱ्याने झाड अंगावर पडल्याने सुरेखा राजू मधे वय २८ रा. डोंगरगाव ता. अकोले यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात शोक व्यक्त होत आहे.
Web Title: Woman Death after falling from tree in storm