Home अहमदनगर अहमदनगर: कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर: कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या.

young farmer commits suicide due to indebtedness

नगर: नगर तालुक्यातील जेऊर येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत  आहे.

याबाबत माहिती अशी की, जेऊर येथील शेतकरी आदिनाथ बाबासाहेब जरे (वय ३७) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून घर ाशेजारील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी (दि. ४) माळखास शिव ारात घडली. आदिनाथ जरे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून सुमारे तीन लाख रुपये कर्ज घेतले होते.

अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी, कांद्याला भाव नाही यामुळे सलग दोन वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात जात आहे. त्यामुळे कर्जाची फेड करता आली नाही. चालू वर्षीही पाऊस न झाल्याने शेतीचे उत्पन्न हाती आलेच नाही. त्यामुळे घर खर्च भागवणेदेखील अवघड झाल्यामुळेच आदिनाथ यांनी आत्महत्या केल्याची माहिती आदिनाथ यांचे भाऊ कानिफनाथ जरे यांनी दिली.

मृत आदिनाथ यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, गावातील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने जेऊर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: young farmer commits suicide due to indebtedness

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here