चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि मुलांवर कोयत्याने वार करून हत्या
Breaking News | Pandharpur Crime: नवऱ्याने आपल्या बायकोसह दोन मुलांवर कोयत्याने हल्ला केला होता, ज्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
पंढरपूरमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथे ही घटना घडली. नवऱ्याने आपल्या बायकोसह दोन मुलांवर कोयत्याने हल्ला केला होता, ज्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सोलापूर हादरले आहे.
घटनेचा तपशील:
- स्थळ: पंढरपूर तालुक्यातील टाकळी.
- आरोपी: तानाजी उबाळे.
- मृत व्यक्ती: पल्लवी उबाळे.
- घटनेचे कारण: तानाजी उबाळे आपल्या बायकोच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता, त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत होती. याच भांडणातून तानाजीने आपल्या बायकोवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
- परिणाम: हल्ल्यात पल्लवी उबाळे गंभीर जखमी झाल्या आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
- इतर: या घटनेत नवरा तानाजी देखील गंभीर जखमी झाला. सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बायकोच्या हत्येच्या घटना वाढत असल्याने खळबळ उडाली आहे.
हल्ल्यावेळी पल्लवी यांची दोन लहान मुलं त्यांना वाचवण्यासाठी आली तर तानाजीने त्यांच्यावर देखील वार केले. तानाजी हल्ला करत असताना पल्लवीने देखील प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये तानाजी देखील गंभीर जखमी झाला. तानाजी उबाळे आणि त्याची दोन्ही मुलं गंभीर जखमी असून त्यांच्यावर पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पल्लवी उबाळेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Breaking News: Man stabs wife and children to death with sickle over suspicion of character