Home अमरावती सत्यजित तांब्यांनी मोदींना फोन लावावा; राहुल गांधींवरील टीकेवरुन काँग्रेसचा संताप

सत्यजित तांब्यांनी मोदींना फोन लावावा; राहुल गांधींवरील टीकेवरुन काँग्रेसचा संताप

Breaking News | Yashomati Thakur on Satyajit Tambe: अपक्ष आमदार सत्यजित तांबे  यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं.

Yashomati Thakur on Satyajit Tambe

अमरावती: काँग्रेसमधील युवा नेते आणि अपक्ष आमदार सत्यजित तांबे  यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करत काँग्रेस हा देशातील विचार आहे, तो संपणार नाही असे सत्यजित तांबे यांनी म्हटलं. मात्र, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना देखील सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, राहुल गांधी अॅक्सेसेबल नाहीत असे म्हणत एका मुलाखतीत तांबे यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावरच टीका केली होती. त्यावरुन, आता काँग्रेस नेत्यांकडून सत्यजित तांबेंना प्रत्त्युतर दिलं जात आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राहुल गांंधींबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सत्यजित तांबेना सवाल केले आहेत. तसेच, तांबे यांनाही मोदींच्या (PM Narendra Modi) भेटीचं चॅलेंज दिलं आहे.

सत्यजित तांबे हे काँग्रेसचे आहेत आणि आता ते अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे, सत्यजित तांब्यांनी मोदींना फोन लावावा, याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणीही मोदींना फोन करावा. मोदीजींनी तासाभरात कुणाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकतो, असे म्हणत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्यजित तांबेंना प्रति चॅलेंज दिलं आहे. राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, भेट देतात. प्रत्येक पक्षाचा आपापला प्रोटोकॉल असतो, तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो. राहुल गांधी सर्वसामान्यांना भेटतात, बोलतात आणि समन्वयक देखील करतात, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केला, अलिप्त राहण्याचा विचार केला त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत सत्यजित तांबे यांच्यावर जोरदार टीका देखील केली.

महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

दरम्यान, सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांपासून काँग्रेसमध्ये काहीही वेगळे पडले आहेत. काँग्रेस पक्षातून त्यांचे निलंबन करण्यात आले होते, तेव्हा वडिल सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि जिंकली. तेव्हापासून ते काँग्रेसपासून काहीही दूर झाले आहेत. मात्र, अद्यापही ते काँग्रेसमध्येच असल्याचे सांगतात.

Breaking News: Yashomati Thakur on Satyajit Tambe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here