Home संगमनेर संगमनेरात “दहशत”  हे माजी आमदारांचे वैफल्यातून विधान-आ खताळ

संगमनेरात “दहशत”  हे माजी आमदारांचे वैफल्यातून विधान-आ खताळ

Breaking News | Sangamner: त्यांना ही दहशत वाटत असेल तर त्यांचे  हे विधान वैफल्यातून  केले असल्याची टीका आमदार अमोल खताळ यांनी  माध्यमांशी बोलताना केली.

Sangamner Not Panic MLA Amol Khatal

संगमनेर: संगमनेर तालुक्यात गेली ४०वर्षापासून असणारी दहशत मोडून काढण्याचे काम सर्वसामान्य जनतेने केले आहे. आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला या जनतेची सेवा करण्याची संधी दिली. त्या मुळे शहर व तालुक्यात वातावरण शांत झाले आहे. जर त्यांना ही दहशत वाटत असेल तर त्यांचे  हे विधान वैफल्यातून  केले असल्याची टीका आमदार अमोल खताळ यांनी  माध्यमांशी बोलताना केली.

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहा वर आमदार अमोल खताळ काही काळ थांबले होते. त्यावेळी विविध माध्यमांशी बोलताना ते  म्हणाले की  मागील सहा महिन्यापासून गावागावात आणि शहरात वातावरण शांत झाले असून आता खऱ्या अर्थाने संगमनेरकर जनता मोकळा श्वास घेत आहे.मात्र आपल्या बगलबच्चांच्या मार्फत दोन गटामध्ये भांडणे लावून देत हाणामार्या घडवून आणत दहशत निर्माण करण्याचे काम सुरू होते.परंतु या तालु क्यातील मायबाप जनतेने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकर्याच्या मुलाला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे .त्यामुळे संगमनेर शहर आणि तालुक्यातील वातावरण गेली सहा महिन्यापासून  शांत झाले आ.हे ही जर त्यांना ही दहशत वाटत असेल तर त्यांचे हे  हास्यास्पद विधान असल्याची टीका आ अमोल खताळ यांनी माजी मंत्री आणि माजी आमदारांचे नाव न घेता केली.

Breaking News: Sangamner Not Panic MLA Amol Khatal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here