अहमदनगर | Ahmednagar Rain | Shrirampur: जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथे आज दुपारी अचानकपणे हरभऱ्याच्या आकाराएवढ्या गाराचा पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
या गारांच्या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा रोपे, कांदा, भाजीपाल्याच्या मोठ्या नुकसानीची शक्यता आहे. करोनाच्या नवनविन व्हेरीएंटमुळे अर्थव्यवस्थेला शेतीनेच तारल्याचे आढळून आले असले तरी या काळात शेतीवरच सातत्याने अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी आणि आता गारपीट यामुळे शेतीचे प्रत्येक हंगामात मोठे नुकसान होत आले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे नुकसान ओढवले जाणार आहे.
Web Title: Hail rain in this part of Ahmednagar