अहमदनगर जिल्ह्यात आज ४१६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ४१६ रुग्ण बरे होऊन त्याना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४२,८८० इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ९१.५१ टक्के इतके झाले आहे. सध्या ३ हजार २४१ रुग्ण उपचार घेत आहेत.
आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांत मनपा ३१, पारनेर ४१, नेवासा ३७, नगर ग्रामीण १, कोपरगाव १३, कर्जत ३४, जामखेड ३५, अकोले ५१, कॅन्टोनमेंट २, श्रीरामपूर १७, श्रीगोंदा १४, शेवगाव २६, संगमनेर ३१ राहुरी ३२, राहता ३४, पाथर्डी १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४६ हजार ८५७ इतकी झाली आहे. तर ७३६ आत्तापर्यंत मृत्यू झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 416 patient discharge