अहमदनगर दिलासादायक: आज जिल्ह्यात १११ जण करोनामुक्त
अहमदनगर(Ahmednagar): जिल्ह्यात आज १११ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात जरी करोनाबाधित दीड हजारांवर पार केले असले तरी हजाराने करोनामुक्त झाले आहेत.
त्यांनी पूर्ण उपचार घेत त्यांच्या दोनही चाचण्या निगेटिव्ह आल्याने तसेच कोणतेही लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
बरे झालेल्या १११ जणांपैकी नगर तालुक्यातील १, नगर शहरातील ३७, कर्जत १, अकोले ७, श्रीगोंदा १, कनटेमेंट झोन मधील १, पाथर्डी १४, राहता ४, नेवासा ५, संगमनेर ३२ असे १११ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार १३६ झाली आहे.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे त्याचबरोबर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Ahmednagar good news 111 corona free