अहमदनगर: कोरोनाच्या मृतांचा आकडा जिल्ह्याची चिंता वाढविणारा
अहमदनगर | Ahmednagar: कोरोनाने शहरासह जिल्ह्यात कहर केला आहे. यातच करोनाच्या मृतांचा आकडा जिल्ह्याची चिंता वाढविणारा दिसत आहे. करोनाचे मृत्यू तांडव सुरूच असल्याचे दिसते. रविवारी एकाच दिवसात जिल्ह्यात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
१७ मृतदेहांवर विद्युतदाहिनीबाहेर सायंकाळी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेल्या गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत १०० जणांचा करोनाने बळी घेतला आहे. रविवारी पुन्हा ४३ वर पोहोचला. जिल्हा शासकीय रुग्णालयातून ३९ तर खासगी रुग्णालयात मृतांची संख्या ५ इतकी आहे. त्यामधील ३७ जणांवर अमरधाम येथे उर्वरित सात जणांवर दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युतदाहिनीबाहेर एकाचवेळी १७ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Corona’s death toll raises concerns in Ahmednagar