Heat Wave | राज्यात पुढील चार दिवस या जिल्ह्यांत उष्णतेची लाट, अवकाळी पाउस
नाशिक| Nashik | Heat Wave : राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. संपूर्ण विदर्भ, खान्देशसह मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून पुढील ४ दिवस म्हणजेच गुरुवार दि.२८ पर्यंत पुन्हा उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवेल. देशात शनिवारी (दि.२३) जळगांव येथे सगळ्यात जास्त ४४ डिग्री कमाल तापमान नोंदवले गेले आहे.
तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून पुढील चार दिवस म्हणजे गुरुवार २८ पर्यंत गडगडाटसह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची (Rain) होण्याची शक्यता असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
Web Title: Heat wave and Rain in these districts for the next four days