भारताचा ऐतिहासिक विजय, ओव्हल मैदानावर ५० वर्षानंतर इंग्लंडला पाजले पाणी
India vs England 4th Test Match: लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळविला. अत्यंत रोमांचक अशा चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडला १५७ धावांनी हरवलेधूळ चारली आहे. आणि ५० वर्षानंतर ऐतिहासिक विजय मिळविला आहे.
५ व्या दिवसअखेर इंग्लंडला २९१ धावांची गरज होती, शिवाय त्यांच्याकडे संपूर्ण संघ फलंदाजीसाठी शिल्लक होता. पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन करत इंग्लंडच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत पाठविले. लंचनंतर खेळपट्टीने आपला रंग दाखविला. जडेजासह बुमराहने आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. १९७१मध्ये भारताने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात या मैदानावर शेवटचा कसोटी विजय नोंदवला होता. भारताने या विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना १० सप्टेंबर ला होणार आहे.
Web Title: India vs England 4th Test Match