Home संगमनेर शेतकऱ्यांनी सरकारची अंत्ययात्रा काढली, संगमनेर

शेतकऱ्यांनी सरकारची अंत्ययात्रा काढली, संगमनेर

शेतकऱ्यांनी सरकारची अंत्ययात्रा काढली, संगमनेर

प्रतिनिधी: तनवी गुंजाळ

आंबी खालसा येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी ५ जूनला सकाळी सरकारची अंत्ययात्रा काढून पुतळ्याचा दहन करत सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. सरकार विरोधात “या सरकारच करायचं काय खाली डोकं वर पाय”, “शेतीमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे”. अशा घोषणा करण्यात आल्या.

शेतीमालाला बाजारभाव नसल्यामुळे संतप्त शेतकर्यांनी १ जूनपासून पुन्हा एकदा आंदोलनाच हत्यार उपसले आहे. एक तर कवडी मोल भावाने शेतमाल विकण्याची वेळ सर्वसामान्य शेतकऱ्यावर आली.

मंगळवारी सकाळी सुरेश गाडेकर , सुरेश कान्होरे, बाळासाहेब ढोले, नामदेव गाडेकर, दीपक धोम्बरे, रवी काशीद, नूतन भुजबळ, अशोक गाडेकर, राजेंद्र गाडेकर, गणेश गाडेकर यांसह महिला आणि शेतकरी आंबी खालसा फाटा येथे एकत्र आले.

शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे अशी मागणी शेतकर्यांनी केली त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली व पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती. येथे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक दिलीप निगोटे व पोलीस उपस्थित होते.  

ad Sangamner Akole News


संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


पहा: Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL Scam


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here