Home अहमदनगर अहमदनगर: विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

अहमदनगर: विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar:  शेतात वीजपंप चालू करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना.

Youth dies due to electric shock

अहमदनगर:  शेतात वीजपंप चालू करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर तालुक्यातील खातगाव टाकळी शिवारात शनिवारी (दि. २४) रात्री घडली. किशोर विलास पवार (वय २४, रा. खातगाव टाकळी, ता. नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किशोर पवार शनिवारी (दि. २४) रात्री त्यांच्या शेतात वीजपंप चालू करण्यासाठी गेला होते. पंप चालू होत नसल्याने स्टार्टर बॉक्समध्ये ते पाहणी करत असताना विद्युत प्रवाह सुरू असलेल्या केबलचा त्यांच्या हाताला स्पर्श होवून त्यांना विजेचा शॉक बसला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्याच्या नातेवाईकांनी त्यास रूग्णवाहिका बोलावून उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. रविवारी (दि. २५) सकाळी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पितळे करीत आहेत.

Web Title: Youth dies due to electric shock

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here