Ahmednagar News: जिल्हा विभाजनाच्या वादात खासदार लोखंडे यांची उडी मागणी करत उत्तर जिल्ह्याचे ”साईनगरी” असे नामांतर करावे, अशी मागणी.
अहमदनगर: जिल्हा विभाजन व नामांतराच्या वादात आता खासदार सदाशिव लोखंडे यांनी उडी घेतली आहे. जिल्हा विभाजन करून दक्षिण जिल्ह्यास ”पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” तर उत्तर जिल्ह्याचे ”साईनगरी” असे नामांतर करावे, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगरमध्ये बोलताना केली. जिल्हा विभाजनासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खासदार लोखंडे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे.
प्रशासनातील अधिकाऱ्यांना काम करताना भौगोलिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात. लोकांना न्याय द्यायचा तर छोटा छोटे जिल्हे हवेत. मी पूर्वी दक्षिण जिल्ह्यात आमदार होतो, आता उत्तर जिल्ह्यात खासदार आहे. दोन्ही ठिकाणी काम करतानाचा अनुभव लक्षात घेतला तर जिल्हा विभाजन आवश्यक आहे. दक्षिण जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे.
त्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले, महिलांना सक्षम केले. त्याचबरोबर साईबाबांमुळे शिर्डीचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेले आहे. त्यामुळे उत्तर जिल्ह्याचे नाव साईनगरी ठेवावे. केंद्र सरकारचे छोटे राज्य, छोटे जिल्हे असावेत, असे धोरण आहे. हेच धोरण राज्य सरकारने घ्यावे.
एका लोकसभा मतदारसंघाचा एक जिल्हा केला, तरी आमचा पाठींबा राहील, अशीही सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, उत्तर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे असावे, याबद्दल बोलताना संगमनेर, श्रीरामपूर, राहता (शिर्डी) अशा विविध ठिकाणची मागणी नागरिक करत आहेत, परंतु सरकारला योग्य वाटेल त्या ठिकाणी मुख्यालय करावे, परंतु नाव साईनगरी ठेवावे, असे लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे.
Web Title: Ahmednagar district should be divided and North should be named Sainagari
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App