Home अहमदनगर अहमदनगर: शेतात पाणी भरताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

अहमदनगर: शेतात पाणी भरताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: शेतात पाणी भरीत असताना विजेच्या तारेला चिकटून येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना.

young man died due to electric shock while filling the field with water

श्रीरामपूर: शेतात पाणी भरीत असताना विजेच्या तारेला चिकटून येथील सागर दिलीप भांड (वय ४१) या तरुणाचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज गुरुवार दि.२८ रोजी सकाळी साडेदहा वाजता बेलापूर बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मयत सागर भांड हे काल सायंकाळी त्यांच्या ऐनतपूर येथील शेतात पाणी भरायला गेले असता अंधार पडला तरी घरी आले नाही म्हणून काळजीपोटी घरच्यांनी मित्रांना ही बाब सांगितली असता त्यांनी शेतात जाऊन पाहिले तेव्हा सागर हे विजेच्या तारेला चिकटून खाली पडलेले दिसले. त्यावरून ते शेतात काम करीत असताना शेतातून गेलेली विजेची तार तुटून खाली पडली. त्या तारेलाच सागर भांड हे चिकटलेले असल्याचे दिसून आले झाले. त्यानंतर विद्युतपुरवठा खंडित करुन त्यांना साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला डॉक्टरांनी सांगितले. सागर हे अत्यंत सुस्वभावी व मनमिळाऊ होते. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: young man died due to electric shock while filling the field with water

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here